शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीनंतर पोलिसांना घरे मिळावीत : धनंजय जाधव -सांगलीत निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याण संघटनेचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:07 IST

सेवानिवृत्तीनंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरे मिळावीत, यासाठी शासनाने पोलीस कल्याण विभाग स्थापन केला पाहिजे, असे मत मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.

सांगली : सेवानिवृत्तीनंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरे मिळावीत, यासाठी शासनाने पोलीस कल्याण विभाग स्थापन केला पाहिजे, असे मत मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांनी व्यक्त केले. याचा पाठपुरावा करण्यासाठी निवृत्तांनी संघटित होऊ लढा दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याण असोसिएशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा मेळावा झाला. त्यावेळी जाधव बोलत होते.पोलीस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक रामराव वाघ, निवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रकाश घार्गे, मदन चव्हाण, आर. के. पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष व निवृत्त पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत शिंदे, उपाध्यक्ष गजानन शिंदे उपस्थित होते.

जाधव म्हणाले, निवृत्तीनंतर अधिकारी व कर्मचाºयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. निवृत्त पोलिसांना आधार देण्यासाठी संघटनेची स्थापना झाली आहे. यासाठी सर्वांनी संघटित राहिले पाहिजे. निवृत्तीनंतर मानसिकदृष्ट्या सक्षम रहावे, कोणत्याही गोष्टीची काळजी करुन प्रकृती बिघडवून घेऊ नका, स्वत:ला सकारात्मक गोष्टीत गुंतवून आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.

रामराव वाघ म्हणाले की, पोलीस दलात सेवा बजावताना सर्वजण धकाधकीचे जीवन जगतात. ज्या सेवेमुळे आपल्याला नाव, पद, प्रतिष्ठा मिळाली त्याचाही प्रत्येकाने सन्मान ठेवला पाहिजे. आपल्याला न्याय हक्कासाठी हिंसक आंदोलन करता येत नाही.

सेवानिवृत्तीनंतर शासकीय सोयी-सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे. सातव्या वेतन आयोगाचा लाभ कधी मिळणार? आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे, असे प्रभाकर घार्गे यांनी सांगितले.निवृत्तीनंतर स्वत:साठी जगले पाहिजे. संघटनेतर्फे निवृत्तांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचे आवाहन मदन चव्हाण यांनी केले. यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या निवृत्त अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला. गजानन शिंदे यांनी आभार मानले.जिल्ह्यात सहाशे सभासद : चंद्रकांत शिंदेचंद्रकांत शिंदे यांनी प्रास्ताविकात, जिल्ह्यात सहाशेहून अधिक सभासद झाले आहेत. ही संख्या लवकरच हजारावर जाईल. भविष्यनिर्वाह निधीसह अन्य सुविधांचा लाभ असूनही त्या वेळेवर मिळत नाहीत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच संघटना स्थापन केली असल्याचे त्यांनी सांगितले.सांगलीत शनिवारी निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाºयांच्या मेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलनाने झाले. यावेळी डावीकडून मदन चव्हाण, आर. के. पाटील, धनंजय जाधव, रामराव वाघ, चंद्रकांत शिंदे, गजानन शिंदे उपस्थित होते.